खरी कोकणी भाषा कोणती ?
शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३
खरी कोकणी भाषा कोणती ?
मंगळवार, २५ जुलै, २०२३
कोकणातल्या निसर्गाची दशा आणि मानवाच्या आयुष्याची दुर्दशा : थोडं वास्तवतेचा स्वीकार करूया. ||"Nature's Wrath in KOKAN: Landslides, Monsoon Floods, and Rain's Lamentable Toll on Life"
amkar.anju@gmail.com
शुक्रवार, ७ जुलै, २०२३
गाव गाता गजाली....
कोकणावर आधारित झी मराठीवर अनेक सिरियल्स
प्रदर्शित झाल्या पण “गाव गाता गजाली या सिरियल्सचे पर्व १ आणि पर्व २ हे दोन्ही पर्व
खरोखरच खूप दर्जेदार असे आहेत. कोकणी बोलीभाषा, गावे, निसर्ग, इथल्या लोकांच्या
भावना, इथली संस्कृती आणि परंपरा यांचा सखोल अभ्यास आणि निरीक्षण करून बारकाईने या
सिरियल्सच्या सर्व एपिसोड्सचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. या सिरियल्समधील सर्व
कलाकारांची देखील एक स्वतःची वेगळी ओळख आणि महत्व या सिरियल्समध्ये वेगळेपणाने
सादर केलेले आहे. या सिरियल्समध्ये ना कोणी एखादा ठराविक हिरो किंवा हिरोईन आहे.
ना व्हिलन आहे. यात सर्वच जण एकाच गावातील वेगवेगळ्या स्वभावाचे हसून-खेळून कधी
भांडून -रागावून पण कायम एकजुटीने राहणारे आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे
गावकरी आहेत. या सिरियल्स मधील सर्वच कलाकार हे प्रमुख कलाकार म्हणून सादरीकरण
केलेले आहे. गाव गाता गजाली या सिरियल्सच्या दोन्ही पर्वाचे २०१७ – २०१८
चित्रीकरण आणि झी मराठी टीव्हीवर सादरीकरण झाले. प्रल्हाद कुरतडकर –
लेखक, राजू सावंत – दिग्दर्शित, संतोष काणेकर -निर्मित या सिरीयलचे चित्रीकरण
करण्यात आले आहे.
या सिरीयलमधील गावाचे नाव सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील “मिठबाव” असे दाखविले आहे. यातील प्रत्येक वल्लीची दोन ओळीत ओळख लिहिणे
महत्वाचे कारण याच वाल्लीमुळे या सिरीयलला एक उत्तम दर्जा मिळाला आहे.:
प्रल्हाद कुरतडकर – म्हणजे “संदीप” रिक्षावाला
ज्याला स्वप्न आणि ध्यास आहे... “सरपंच” बनायचे. त्याच्या प्रत्येक वाक्याची
सुरुवात “मेड झालस का ?, आज या ठिकाणी
माझ्या मतदार संघात....” असे बोलून होते.
दिगंबर नाईक – सुहास नावाची भूमिका साकारली आहे.
जो सर्व कामे अर्धवट ठेवतो आणि “व्ह्तल व्ह्तल सगळ व्हतल.” बोलून विषय टाळतो. आणि “विषय
कसो हा.. “ बोलून नवीन मुद्द्याला हात घालतो.
लीना पाटकर – शोभा म्हणजे सुहासची पत्नी जी सुख –
दुख कोणत्याही क्षणी रडून आणि तोंडाला पदर लावूनच आपल्या भावना व्यक्त करते.
सार्थक वाटवे – क्रिश म्हणजे सुहासचा मुलगा
ज्याला “अभ्यास केल कि माका गरगरता”
सर्वात लहान आणि मस्तीखोर कलाकार.
भरत सावले – विष्णू आबा म्हणजे गावातील गुरव.
देवाला गाऱ्हाणे घालणारा कौल लावणारा आणि देवाशी थेट सवांद करणारा.
अस्मिता खटखटे – गोदा म्हणजे आबाची पत्नी जी खूप
कंजूस आणि काटकसर करणारी दाखवली आहे.
किशोर रावराणे – वामन चहाचा घोट घेत घेत छोटीशी
बातमी संपूर्ण गावभर पसरवणारा गावातील सोशल मिडिया. “मी कधी कुणाक काय सांगतय काय ?” असे बोलून सर्व
गावभर बातमी पसरवतो.
रोहित रोहन कोटेकर - करण अर्जुन म्हणजे जुळी भावंडे. जे प्रत्येक
गोष्ट एकसारखी बोलतात – करतात आणि एकाच मुलीवर प्रेम करतात. रुचिता शिर्के –
शिल्पा म्हणजे आबाची मुलगी जिच्यावर करण – अर्जुनाचे प्रेम असते.
मिथिल म्हाडेश्वर – बैल ज्याला सतत भूक लागलेली
असते. त्यांच्या तोंडी कायम “मला ना आता
भूक लागलीय.“ हे वाक्य हमखास असणार. याच्यासाठी “खाणे आणि खात राहणे” हेच अतिंम
सत्य आहे
विश्वजित पालव - प्रसाद म्हणजे शाहरुख अंगात आलेला त्याची नक्कल
करणारा कलाकार. ज्याचे गावातील पद्मा
नावाच्या मुलीवर प्रेम असते. दिपाली
जाधव – पद्मा म्हणजे नाम्या काकाची मुलगी. जिला प्रसाद म्हणजे चित्रपटातील
हिरो सारखा वाटत असतो.
रोहन सुर्वे – मनोहर
म्हणजे ज्याला “बळी” म्हणून चिडवतात. अर्थात बायको आणि आईच्या भांडणात निराश
झालेला व्यक्ती. भाग्यश्री राणे –
गायत्री म्हणजे मनोहरची बायको जी भांडखोर असली तरी तितकीच मायाळू असते. प्रतिभा
पाटील – बहिरी आजी म्हणजे मनोहरची आई. जी एका कानाने बहिरी असते. ऐकू येत नाही
म्हणून अर्थाचे अनर्थ करून भांडत असते.
मुकेश जाधव – बबन धा
रुपये दे मग सांगतो. नेहमी दारूच्या नशेत असतो आणि वेगवेगळ्या प्रसंगावर गाणी बोलत
असतो. कवि बनण्याचे स्वप्न भांग्ल्याने
निराश झालेला असतो. पण तरीही गावातील प्रत्येक प्रसंगावर गाणी बोलत असतो.
अभय नेवगी – नाम्या काका
म्हणजे ज्यांचे गावात स्वतःचे सलून आहे. जिथे एकत्र बसून गजाली करतात. “ वस्तारो
मारेन “ असे बोलून आपला राग व्यक्त करत असतात. शुभा कदम – शकू काकू म्हणजे नाम्या काकाची पत्नी
कल्पना सारंग – सरकती आजी म्हणजे
जिला वयामुळे चालायला जमत नाही. जी सरकून सरकून चालते. बहिरी आजीची बाल मैत्रीण
असते. जिचा मुलगा शहरांत राहत असतो. ती
एकटीच गावी राहत असते.
निलेश पवार - शाळेतील मास्तर शुभांगी भुजबळ – सविता मास्तरची
बायको यांची दुसऱ्या जिल्हात वरच्या पदासाठी बदली झाली तरीहि ते आपलं गाव सोडून
जात नाही. ज्यांचे गावात स्वतःचे छोटेसे किराणामालाचे दुकान आहे.
या सिरीयलमध्ये नेमकं काय विशेष आहे ?
या सिरियलमध्ये वरील सर्व प्रमुख कलाकार मिळून
एक गाव दाखवले आहे. गाव म्हंटले कि गावात कोणत्याही गोष्टीवरून चर्चा – गप्पा होत
असतात. पण “गजाली” म्हणजे एका मुद्द्याने
गप्पांची सुरुवात होते ते भलत्याच गोष्टीवर जाऊन पोहचतात. गावातील गल्ली ते दिल्ली
पर्यंतच्या गप्पा म्हणजे “गजाली”. या सिरीयलमध्ये अश्याच गावातील प्रत्येक छोट्या
गप्पाचा विषय ठरणारे “ गावातील प्रसंग “ कथेच्या स्वरुपात मांडले आहे. ज्यात “
पद्मा- प्रसादचे प्रेम प्रकरण” “मनोहरचा बळी” “शाळेतील खिचडी प्रकरण” “गाऱ्हाणे”
असे अनेक मुद्दे त्यामागील गावातील सुख -दुःखाचे प्रसंग आणि आपुलीकीची –
जिव्हाळ्याची भावना या सिरीयलमध्ये खूप
अचूक पद्धतीने मांडली आहे.
जर तुम्ही हि सिरीयल पाहिली नसेल तर युट्युबवर
याचे दोन्ही पर्व आहेत... नक्की पाहा.. तुम्हाला तुमचे गाव आणि गावातील गजाली
नक्की आठवतील.
लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे. तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत.
amkar.anju@gmail.com
रविवार, १७ जुलै, २०२२
आजी आणि लिमलेटच्या गोळ्या..
*आजी आणि लिमलेटच्या गोळ्या*
माझं
लहानपण
कोकणातल्या
एका
उंच
डोंगरावर
वसलेल्या
सुंदर
अशा
टुमदार
गावात
गेलं.
मुंबई
गोवा
हायवेला
लागून
गाव
असलं,
तरी
वाडीतुन
हायवेकडे
यायला
त्यावेळी
लोकांना
10 मिनिट
पायपीट
करून
जावं
लागे.
त्यावेळी
वीजही
पोहचली
नव्हती
गावात.
गावची
त्यावेळी
लोकसंख्या
साधारण
50 ते
60 उंबऱ्यांची.
या
60 घरांच्या
मध्यातून
खाली
आणि
वर
जाणारी
साधारण
800 पेक्षा
जास्त
पायऱ्यांची
पाखाडी
आहे.
ही
पाखाडी
म्हणतात
देवाने
बांधलेली,
हीचा
शेवट
वरती
"सडा"
म्हणजे
एक
सपाट
डोंगरावरचा
भाग
जिथे
साधारण
एक
विमानतळ
उभं
राहील
इतका
मोकळा
भाग,
म्हणून
त्याला
सडा
म्हणत.
पूर्वी
सर्वांची
रहदारी
याच
पाखडीने
होई.
या
पाखाडीचा
खालचा
शेवट
जिल्हा
परिषदेची
शाळा,
जिथे
पिंपळाचे
मोठे
झाड
आणि
देवाची
साण
आहे
तिथे.
आता
दुसऱ्या
बाजूने
रस्ता
झाल्याने
या
पाखाडीने
रहदारी
कमी
झाली
आणि
प्रवास
गाड्यांनी
सध्या
वाढलाय,
मग
पर्यायाने
सोबत
आजारांचा
प्रवासही
तितकाच
वाढला.
आता
कोणी
पायाने
चालतच
नाहीत.
काढली
गाडी
गेला
बाजारात.
मागवली
रिक्षा
गेला
फिरायला.
पूर्वी
सारखं
नागमोडी
वळण
घेत
जाणाऱ्या
वहीवाटाही
राहील्या
नाहीत,
पूर्वी
या
वहीवाटांवरून जाताना मध्येच लागणाऱ्या घरांतल्या लोकांना हाक मारत, विचारपूस करत जाण्याची मज्जा काही औरच होती! .. माझ्या आजीच्या मतानुसार आता लोकं डोक्याने चालतात (आमच्या आजीचे टोमणे,म्हणी,गाणी पुऱ्या गावात सर्वश्रुत, ती असेच ऐकवायची लोकांना बऱ्याचदा). चालणं कमी झाल्याने पर्यायाने आजार वाढले, पूर्वी हृदयविकाराने कोणी मेलं असं ऐकलंच नव्हतं आता सर्रास ऐकू येतं.
या
पाखाडीने
खालून
पिंपळाडुन
वाडीत
यायला
साधारण
15 मिनिट
लागत
आणि
दम
इतका
लागे
की,
बस्स
आता
नकोच
चालणं!..वाडीतून वर सड्याकडे जायला अजुन साधारण 25 मिनिटं लागंत. याच पाखाडीने तेव्हा लोकं उन्हाळ्यात 3 हांडे एकावर एक घेऊन पाणी भरत असंत. पाण्याची मोठी टंचाई उन्हाळ्यात असे आणि त्यात लग्न कोणाचे असले की अख्खा गाव त्या लग्न घरात पाणी देण्यासाठी मदत करत असे.
पावसाळ्यात
मात्र
ही
कोरडी
पाखाडी
अगदी
पाण्याने
न्हाऊन
जायची..पाणी इतकं वाहायचं की, आम्ही मुलं कागदाची, झाडांची पानं घेऊन होडी बनवून यातून आपल्या मालकीची होडी आनंदाने सोडत असू, इतकी श्रीमंती.
अशा
या
हिरव्यागार,
माणसांनी
भरलेल्या
गावात
माझं
बालपण
गेलं.
प्रत्येक
जण
एकमेकांवर
प्रेम
करायचा.
विचारपूस,
आपुलकी
यांनी
आपल्याकडे
काही
कमी
आहे
याची
लोकांना
कोणालाच
जाणीव
नसायची.
मी
ही
गरीब
असूनही
श्रीमंतीत
न्हाऊन
जगत
होतो.
आमचे
आजोबा
यांना
एकूण
5 भाऊ
आणि
त्यांची
मुलं
आणि
मग
त्यांची
मुलं
अशी
मिळून
आम्ही
भावंडं
(चुलत,
सख्खी)
त्यात
आत्या,काका असा मोठा गोतावळा असे.
दिवसा
शाळेतून
आल्यानंतर
खेळणे,
खाणे,बागडणे असं सगळं एकत्र चाले. रात्री वीज नसल्याने बत्ती, कंदील यावर अभ्यास आणि अभ्यास झाला की चोरचिठ्या, काचाचे खेळ, खांब खांब, गाण्याच्या भेंड्या, गोष्टी नाहीतर असंच कोणी लग्नाची गाणी,चित्रपटातली गाणी ऐकवायचे. आम्ही मन लावून ऐकायचो किंवा तसं गाण्याचा प्रयत्न करायचो. असे छान दिवस जायचे.
आमचे
आजोबा
गवंडी
कामाला
जात,
त्यांचे
सगळे
भाऊही
तसंच
काम
करीत
असंत,
शिक्षण
नसल्याने.
मग
ही
मंडळी
कामावरून
आली
की
प्रत्येक
नातवाला
खाऊच्या
पुड्या
आणीत,
प्रत्येकाला
वेगवेगळ्या.
या
खाऊत
चणे,
शेंगदाणे,
शेवबुंदी,
चॉकलेट्स,
गोळ्या,
बिस्कीट,
बुंदी
लाडू,
कुरमुरा
लाडू
असं
वेगवेगळं
असायचं.
ही
मेजवानी
आम्हाला
खास
असायची.
आम्ही
सगळी
चुलत,
सख्खी
भावंडं
मिळून
संख्या
खूप
असायची,
त्या
मानाने
खाऊ
कमीच
पडायचा.
पण
आमची
आजी
त्याची
विभागणी
अगदी
समान
करायची.
विशेष
म्हणजे
आमचे
हे
सगळे
आजोबा
त्यांच्या
सूनांनाही
खाऊची
पुडी
वेगळी
आणून
सुपूर्द
करायचे.
मला
आठवतं
या
खाऊत
जेव्हा
लिमलेटच्या
गोळ्या,
चॉकलेट्स
असायची
तेव्हा
तिचं
वाटप
करताना
ती
संख्येने
नेहमीच
कमी
पडायची.
मग
आजी
ह्या
गोळ्या
आपल्या
पदरात
पकडायची
आणि
दाताने
तिचे
तुकडे
करून
सगळ्यांना
थोडे
थोडे
त्याचे
वाटप
करीत
असे.
यातूनच
आम्ही
शेअरिंग
आणि
केअरिंग
शिकलो.
आपल्याकडे
कितीही
कमी
असले,
तरी
त्यातून
सगळ्यांना
आपण
दिले
पाहिजे
हे
आम्हाला
आजीने
शिकवले.
खाऊच्या
पुड्या
सोडताना
आमची
चुलत
भावंडंही
सोबत
असंत,
त्यांनाही
देता
यावं
यासाठी
आजी
या
पदरातल्या
गोळ्यांना
दाताखाली
चिरडायची..मुळात ती गोळी नाही तर आमच्या मनातला स्वार्थभाव चिरडायची आणि म्हणूनच आमच्यात आज आपल्याकडची प्रत्येक वस्तु दुसऱ्यालाही देण्याची भावना रुजली. या पदरातल्या गोळीला आम्ही उष्टी गोळी म्हणून कधीच हिणलं नाही. ती आम्हाला खूप गोड आणि श्रीमंत वाटायची कारण तिला आजीच्या प्रेमाचा आणि पदराचा स्पर्श होता.
आता
आमच्या
मुलांना
100 रुपयाच्या
कॅडबरी
चॉकलेट्स
देतो
आम्ही,
पण
त्यांना
तो
मायेचा
पदर
आणि
ती
प्रेमाची
श्रीमंती
कुठून
कळणार?
मग
शेअरिंग
आणि
केअरिंग
तर
दुरचंच?
आजीचा पदर आणि तिच्या दाताखालची गोळी आम्हाला आजही आठवते, पण आज ना ती गोळी राहीली, ना पदर राहिला आणि ना आजी. पण आजीने दिलेली शिकवण, प्रेम यांनी आम्ही मात्र श्रीमंत झालो. आजही त्या आठवणीत न्हाऊन जातो. म्हणून आजही जेव्हा मी लिमलेटची गोळी बघतो तेव्हा आवर्जून मला आजीची आणि अजीच्या पदराची नक्कीच आठवण येते.🙂
दीपेश मोहिते, कल्याण
लिहायला, वाचायला आवडतं. निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण करायची आवडं.
कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन
कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...
-
पुस्तकाचे नाव : The Horse, The Mole, The Fox and The Boy लेखकाचे नाव : चार्ली मॅकेसी /Charlie Mackasey "The Horse, The Mole, The Fox ...
-
"अंतिमा" || Antima by Manav Kaul बाहर खुला नीला आकाश था और भीतर एक पिंजरा लटका हुआ था | बाहर मुक्ति का डर था और भीतर सुरक्षित ...
-
कोकणात लग्न असते तेव्हा.... PC : Prathamesh Nalawade लहानपणी मुंबईला असताना कोणाचेहि लग्न असले तर मी खूप खुश होऊन जायचे. पहिले कारण म्हणजे...




