बुधवार, १७ एप्रिल, २०२४

"अंतिमा" || Antima by Manav Kaul

 "अंतिमा" || Antima by Manav Kaul

antima_book_novel_by_manav_Kaul

बाहर खुला नीला आकाश था 

और भीतर एक पिंजरा लटका हुआ था | 

बाहर मुक्ति का डर था 

और भीतर सुरक्षित जीने की थकान | 

उसे उड़ने की भूख थी 

और पिंजरे में खाना रखा हुआ था | 


"अंतिमा" या पुस्तकाच्या नावावरून कोणत्या तरी मुलीचे नाव असेल असे वाटू लागते. पुस्तक वाचण्याआधीच "अंतिमा" नामक स्त्रीची कहाणी वैगरे असेल असा अंदाज बांधला जातो. पुस्तक वाचताना लक्षात येईल कि, हा लावलेला अंदाज पूर्णतः चुकीचा असतो. "काही चुकलेले अंदाज चांगले असतात. " त्या प्रमाणे या पुस्तकाच्या नावावरून चुकलेला अंदाजच... मला हे पुस्तक वाचण्यास अधिक फायदेशीर ठरले. 

"अंतिमा" हि एका एका लेखकाची गोष्ट.. त्याच्या लिखाणाचं गोष्ट... त्या लिखाण प्रक्रियेतील गोष्ट ... त्या लिखाणासंबंधित वैयक्तिक आयुष्याच्या चढाव - उताराची गोष्ट... नेमके कोणत्या विशिष्ठ थीम मध्ये या पुस्तकाला बसविणे थोडे अवघडच वाटते. मानव कौलचे लिखाण वाचताना अनेकदा आपण त्या लिखाणात आहोत का असा भ्रम होऊ लागतो. या कादंबरीमध्ये देखील त्यांनी एक असाच भ्रम तयार केला आहे. ज्यात वाचक  नेमके आपण रोहित नामक लेखकाची गोष्ट समजून घेतोय कि तो लिहीत असेलेल्या कथेतील गोष्ट समजून घेतोय. हा विचार करताना अनेकदा बुचकळ्यात पडल्यासारखे वाटू लागते.  

पुस्तक आणि पात्रांची ओळख थोडक्यात :  

कोरोना काळ हा प्रत्येकासाठी तितकाच नवीन आणि विलक्षण होता. कोरोनाच्या लाटेत अनेक जण होरपळले. कोरोना आजार शारीरिक लक्षणांवरून दिसणारा असला तरीही त्याचे मानसिक परिणाम अधिकतर होते. "अंतिमा" हि कादंबरी अश्याच कोरोना काळातील लोकडाउनच्या कालावधीवर आधारित आहे. ज्यात रोहित नामक लेखक आपल्या अर्धवट लिखाणासोबत स्वतःशी संवाद साधत असतो. 


"कुछ भी नया करना कितना कठिन है। फिर चाहे वो गलती ही क्यों न हो।"


रोहित आपल्या लिखाणातील पात्रांशी देखील बोलायला लागतो. पण हि पात्रे नेमकी फक्त लिखाणात आहेत कि खऱ्या आयुष्यात देखील आहेत. हे कोड शेवट पर्यंत या कादंबरीत टिकून राहिले आहे.  रोहित हे मुख्य पात्र असले तरीही  पवन, अंतिमा, अरु, पब्लिशर, वर्मा मॅडम, दुष्यंत,  रोहितचे वडील आणि सलीम हि पात्रे देखील क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवणारी दाखविली आहेत.   हि पात्रे नेमके रोहितच्या लिखाणातील आहेत कि त्याच्या वैयाक्तिक आयुष्यातील हा संभ्रम झाल्याशिवाय कादंबरी पूर्णच होऊ शकणार नाही. 


रोहित हा नवीन लेखन करण्यासोबत आपल्या जुन्या लेखनाचे परीक्षणदेखील करत असतो. जुने लेखन करताना नेमका कोणता विचार केला होता. याबद्दल सुंदर परीक्षण यात मांडले आहे. काही सुंदर अर्थपूर्ण कविता देखील या पुस्तकात वाचायला मिळतात. ज्यामुळे हि  कादंबरीअजूनच अर्थपूर्ण आणि सुंदर कलाकृती बनते. 


हि कादंबरी कोणी वाचावी :

जर तुम्हालाही लिखाणाची आवड असेल.. किंवा लिखाण प्रक्रियेत उत्सुकता असेल. तर नक्की हि कादंबरी वाचावी.


__________

amkar.anju@gmail.com 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

"अंतिमा" || Antima by Manav Kaul

 "अंतिमा" || Antima by Manav Kaul बाहर खुला नीला आकाश था  और भीतर एक पिंजरा लटका हुआ था |  बाहर मुक्ति का डर था  और भीतर सुरक्षित ...