सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

जयंती :जयभीम-जयशिवराय घोषणेंच्या पलीकडे जाणारा उत्सव

जयंती :जयभीम-जयशिवराय घोषणेंच्या पलीकडे जाणारा उत्सव

"जयंती" हे नाव वाचलं किंवा ट्रेलर पाहिला की खालील प्रश्न 100% मनात येतात.

जयंती चित्रपटातील जयंती नेमकी कोणाची आहे ?
शिव जयंती की भीम जयंती ?
कोणी बघावा, शिव भक्तांनी की भीम भक्तांनी ?

कोणत्या समाजासाठी / जातीसाठी हा चित्रपट बनलाय ?
प्रत्येकाला माहीत आहे की आपल्या देशात जयंत्या कशा साजऱ्या होतात.  त्या कशा करू नये यावर हा चित्रपट उपदेश तर नाही आहेत ना?
असे अनेक प्रश्न मनात येतात. 

या साऱ्या प्रश्नाची उकल करत हा चित्रपट जयभीम जयंशिवराय या घोषणेंच्या पलीकडे जातो. बाबासाहेबाना मानणारा समाज असो, शिवाजी महाराजांना मानणारा समाज असो , किंवा  महात्मा फुल्यांना मानणारा समाज.... पण ज्यांना मानता त्यांचे अंधभक्त आणि डोळस अनुयायी यांच्यातील संघर्ष या चित्रपटाने खूप प्रभावी पणे मांडला आहे.

चित्रपटाची पार्श्वभूमी
चित्रपटाची कथा ही एका अशा नायका (ऋतुराज वानखडे)  भोवती फिरत असते की जो स्वतःला शिवाजी महाराजांचा मावळा समजत असतो पण त्याला शिवजयंतीला मुसलमानांची वर्गणी चालत नसते. घरात बाबासाहेबांचा फोटोही नको असतो कारण त्याच्या आईला घरात *जयभीम* वाले नको असतात.  शिवाजी मान्य असतो पण मुलीला रस्त्यात अडवण्यात त्याला काहीच चूक वाटत नसते. 
 एकंदरीत जातीवादी आणि धर्माध असा या चित्रपटाचा नायक असतो. 
याच नायकाच्या मनातल्या अंधभक्ताची आणि त्याच्यातच दडलेल्या डोळस अनुयायीशी संघर्ष चालू होतो. 
आता या संघर्षाचा नेमका परिणाम काय होतो हे समजण्यासाठी तुम्हाला चित्रपटच पहावा लागेल. 

चित्रपटातील प्रतीकं

चित्रपटात धनंजय किर यांनी लिहिलेल डॉ  बाबासाहेब आंबेडकर , कॉ पानसरेनी लिहिलेलं शिवाजी कोण होता? महात्मा फुलेंच गुलामगिरी आणि  आ.ह. साळुंखेच विद्रोही तुकाराम या पुस्तकांचा प्रतीक म्हणून केलेला वापर या चित्रपटाचं वेगळंपण दाखवतो.  एका प्रसंगात पुरोहितकडून बांधून घेतलेले धागे गंडे फेकून देणं, हे बंधन झिडकरण्याचं प्रतीक दर्शवितो.   भगवे, निळे झेंडे, गाड्यांवरच्या घोषणा आणि स्टिकर्स, जयंतीच्या पार्ट्या.... अशा प्रसंगाचा प्रतीकं म्हणून केलेलं वापर  हा चित्रपट निळ्या, भगव्या , हिरव्या रंगाआढ लपलेलं नग्न वास्तव दाखवतो.

चित्रपटातील भाषा

मराठी चित्रपट हा आजकाल टिपिकल पुणेरी लाहेजात अडकलेला असताना, या चित्रपटाने वऱ्हाडी फोडणी झणझणीत दिली आहे.या चित्रपटाने उघड भाषेचा केलेला वापर या चित्रपटाला वास्तववादी बनवतो. चित्रपटातले संवाद ही चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू म्हणावी लागेल. 

चित्रपट का पहावा?

हा चित्रपट प्रत्येकाने बघावं....कडू सत्य कदाचित पचनी पडणार नाही .... पण रोग बरा करायला औषध कडूच लागत.
तुम्ही महाराजांबद्दल / बाबसाहेबाबद्दल कितीही आदर असला किंवा द्वेष असला तरी हा चित्रपट पहावा.

एका चित्रपटाने बाबासाहेब किंवा महाराज नाही समजणार पण त्यांना समजून घ्यायची दिशा हा चित्रपट देतो.
शेकडो वर्षाची जळमटे बाजूला काढून जयभीम आणि जयंशिवराय चा खरा अर्थ समजून घेण्यासाठी हा चित्रपट पहावा.

1 टिप्पणी:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...