मंगळवार, ११ मे, २०२१

कोकणावर आधारित चित्रपट

 कोकणावर आधारित चित्रपट

apali-writergiri-kokan-movie-review-hapus-kaksparsh-ventilator

आज कोकणी माणसं कामानिमित्त कोकण सोडून इतर जिल्हाराज्य किंवा देशात वास्तव्य करत आहे. पण कोकणी व्यक्ती  जगाच्या कोणत्याही ठिकाणी राहायला गेला तरीही कोकणी व्यक्ती  इथली मातीनिसर्ग  आणि  माणसं यांची आपुलकी हि कायम मनात राहिलीच. कोकणावर आधारित चित्रपट असला कि,  हेच आपले पण कोकणी माणूस कायम शोधायचा प्रयत्न करत असतो. इथली मधाळ  कोकणी भाषा आणि हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी कोकणी व्यक्ती कायम आतुर झालेला असतो.  अगदी फेसबुकवर पोस्ट पाहताना पण कोकणातील काही दिसले कि लगेच आपण ती व्हिडिओ किंवा पोस्ट पूर्ण वाचतो किंवा बघतो. असेच काही कोकणावर आधारित  चित्रपट आहेत जे आपल्याला आपल्या मातीशी आणि माणसाशी जोडून ठेवतात.

नवरा माझा नवसाचा :

हा एक कॉमेडी चित्रपट आहे.  सचिन पिळगांवकर, अशोक सराफ  आणि सुप्रिया पिळगांवकर हे प्रमुख कलाकार आहेत. सचिन पिळगांवकर यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट बॉम्बे टू गोवा या जुन्या हिंदी  चित्रपटा सारखाच आहे. 

ज्यात सचिन आणि सुप्रिया त्यांच्या लहानपणीचा नवस फेडण्यासाठी राज्यपरिवहन बस मार्गे गणपतीपुळे येथे जात असतात.  हा प्रवास करताना इतर सह प्रवासीच्या  छोट्या छोट्या गमतीशीर गोष्टी सर्वाधिक लोकप्रिय आहेत.  हा चित्रपट पाहताना कोकणचा प्रवास केल्याचा आनंद नक्कीच मिळेल. सोबतच गणपतीपुळे मंदिराचे सुंदर दर्शन हि मिळून जाते.

हापूस :

या चित्रपटात कोकणातील शेतकरी कुटुंबाची विनोदी कथा पाहायला मिळते. या चित्रपटात शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, मधुरा वेलणकर, पुष्कर श्रोत्री, सुलभा देशपांडे, मृणाल देशपांडे आणि इतर कलाकार या चित्रपटात उत्तम काम केले आहे. या चित्रपटातूनच शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजित साटम यांनी प्रथमच या   चित्रपट  दिग्दर्शन करत आपले पदार्पण केले आहे.

या चित्रपटातील "आंबा पिकतो रस गळतो... कोकणचा राजा कसा धंदा मांडतो..." या गाण्यातील अर्थानुसारच संपूर्ण चित्रपटाची कथा आधारीत आहे. "हापूस" आंबा म्हणजे कोकणचा राजा आहे. पण तरीही कोकणातील शेतकरी मात्र या हापूस ने आपल्या कुटुंबाचं पोट  का भरू शकत नाही?  कोकणातील आंबा बागायतदार असलेले कुटुंब जेव्हा आंब्याचा व्यापार करताना  झाडावरील आंबा बाजारात येई पर्यंत किती अडचणींना सामोरे जात असतो. पण कितीही अडचणी असल्या  कुटुंबाची एकजूटता हि या चित्रपटात खूप उत्तम पद्धतीने मांडली आहे. कोकणच्या निसर्ग सौंदर्याची उत्तम सिनेमॅटोग्राफी या चित्रपटात दिसेल पण कोकणी भाषेची कमतरता हि दिसून येते.  पण तरीही जे आंब्याचा व्यवसाय करतात त्यांना हा चित्रपट आपलासा नक्कीच वाटेल.

व्हेंटिलेटर चित्रपट :

राजेश म्हापुस्कर दिग्दर्शित आणि प्रियांका चोप्रा निर्मित हा एक विनोदी आणि भावनिक यांची रंगसंगत असेल चित्रपट आहे.  या चित्रपटात आशुतोष गोवारीकर, सुकन्या कुलकर्णी, जितेंद्र जोशी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील १०० हुन अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे.  संपूर्ण चित्रपटाची कथा हि  "कामरकर" या कुटुंबावर आधारित आहे.   कामरकर कुटुंबातील सर्वात मोठे काका हे अचानक मोठा आजाराने कोमा मध्ये जातात. ते व्हेंटिलेटरवर असल्याची बातमी त्यांच्या नातेवाईकांना कळते. याच दरम्यान कोकणातील गणेशोत्सव हि येणार असतो.  कोकणातील गणेश उत्सव,  कोकणातील जमिनीवरून कुटुंबातील वाद, नातेवाईकांचे इतर आपापसातील वाद  आणि स्वतःचे वेगवेगळे पैलू दाखवणारे नातेवाईक या सर्व गमती जमतीने भरलेला हा चित्रपट आहे. अखेरचे घटका मोजत असलेले काका आणि चित्रपटातील पात्रे सर्वानीच उत्तम अभिनय केला आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वर्ष २०१७ पर्यत सर्वाधिक कमाई केलेला दहावा चित्रपट म्हणून या चित्रपटाची वेगळी ओळख निर्माण झाली होती.

 काकस्पर्श : 

गुहागर तालुक्यातील पालशेत मध्ये चित्रीकरण झालेला चित्रपट. महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेला हा चित्रपट आहे.  सचिन खेडेकर, प्रिया बापट, मेधा मांजरेकर,  केतकी माटेगावकर, अभिजित केळकर आणि वैभव मांगले यांनी प्रमुख कलाकार म्हणून उत्तम भूमिका साकारली आहे.  हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील कोकणी ब्राह्मणी कुटुंबातील ह्र्द्यस्पर्शी वास्तवदर्शी चित्रपट आहे. रूढी परंपराच्या विळख्यात अडकलेला माणूस, विधवा महिलांची घुसमट, स्त्रीचे मुलभूत हक्क आणि पाखंडी समाज यांचे प्रश्न मांडणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात खूप सुंदर अर्थांच्या ओव्या आहेत.  त्यासोबतच निसर्गाने मुक्तहस्ते दान पावलेली कोकण भूमीचे सौंदर्य या चित्रपटात पाहायला मिळते.

नारबाची वाडी :

हा सिनेमा 'सज्जनो बागान' या बंगाली नाटकावर आधारित आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित, गुरु ठाकूर यांचे लेखन तसेच दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, किशोरी शहाणे, विकास कदम, निखिल रत्नपारखी यांनी प्रमुख कलाकार म्हणून भूमिका साकारली आहे. संपूर्ण चित्रपट हा कोकणातील नारळी-सुपारीच्या माडीत आणि तिथल्या घरात चित्रीकरण केले आहे. कोकणातील माणस हि नारळ आणि फणसासारखी बाहेरून कडक असेल तरी आतून गोड आणि मधाळ असतात. या चित्रपटातून तोच गोडवा दिसून येतो. गावातील खोताला हि  नारबाच्या वाडीच्या हिरवळ आणि गारव्याने भुरळ पडते. नारबाची वाडी आपल्याला कशी मिळेल? या गमती जमती वर आधारित हा संपूर्ण चित्रपट आहे.  संपूर्ण चित्रपटातील कोकणातली हिरवळ बघून कोकणात जाण्याची इच्छा हमखास होतेच.

किल्ला : 

हा अविनाश अरुण दिग्दर्शित आणि आर्किट देवधर, गौरीश गावडे, अमृता सुभाष, पार्थ भालेराव आणि अथर्व उपासनी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सदर चित्रपटाला अनेक अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नुकतेच वडील गमवलेल्या आणि आईच्या नोकरीमुळे पुणे शहरातून कोकणातील एका गावात बदली झालेल्या सातवी इयत्तेत शिकत असलेल्या मुलाची कथेवर आधारित हा चित्रपट आहे. बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे प्रयत्न यांचे उत्तम चित्रीकरण केले आहे. या चित्रपटात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रीकरण झाले आहे. चित्रपटात कोकणी भाषेची कमतरता असली तरीही चित्रपटाच्या कथेचा गहिरा अर्थ आणि स्वर्गीय कोकणाची हिरवळ मात्र अप्रतिम आहे. 


लेखकाची ओळख : अंजली प्रवीण, या कोकणात वास्तव्य करणारी आहे.  तसेच त्या महिला, बाल, कुटुंब , क्रिमिनल जस्टीस सिस्टीम सारख्या सामाजिक क्षेत्रात समुपदेशन आणि डेटा विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com


४ टिप्पण्या:

कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन

 कांदे पोहे कि सौदेबाजी....की विवाह संस्थेच फाऊंडेशन   काही चांगल्या / कमावत्या मुलांची लग्न ठरत नाही मग ती मुलं किंवा त्याच्या घरचे मुलींना...