शांतता! कोर्ट चालू आहे...
"शांतता कोर्ट चालू आहे" विजय तेंडुलकर यांचे नाटक भारतभर १४ भाषांमध्ये प्रदर्शित झाले. ज्यात १९६७ मध्ये त्यांनी "कुमारीमाता- भ्रूणहत्या " सारख्या विषयाची मांडणी केली आहे. गंमत म्हणजे या नाटकाचे मला विकिपीडिया पेज दिसले. पण जेव्हा त्या ते पेज वाचले तेव्हा लक्षात आले कि, यात नाटकाच्या विषयाबद्दल काहीच लिहिले नाही. त्यानंतर अजून काही लेख शोधण्याचा प्रयत्न केला तरीही फारसे लिखाण दिसले नाही.
"विजय तेंडुलकर" हे नाव ऐकले कि साहजिकच त्यांनी लिहिलेली नाटके डोळ्यासमोर उभी राहतात. घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर, कमला, गिधाडे, माणूस नावाचे बेट यासारखे अनेक प्रसिद्ध नाटके त्यांनी लिहिली. त्यांनी ६०-७० च्या दशकात लिखाणातून एक वेगळी क्रांती करण्याचा प्रयत्न केला. नाटक हे फक्त विरंगुळ्यासाठी किंवा मनोरंजनासाठी नसून त्यातून समाजाचा आरसा देखील दाखवता येतो. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर प्रकाश आपल्या लिखाणांमधून टाकला. यांच्या खडतर स्पष्टपणामुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आणि त्यांच्यावर टीका विरोध हि तितकेच झाले.
त्यातीलच एक नाटक म्हणजे "शांतता कोर्ट चालू आहे." या नाटकाला ५५हुन हि अधिक वर्षे पूर्ण झाली. या नाटकातील प्रमुख पात्र 'सुलभा बेणारे' ही भूमिका करणाऱ्या सुलभा देशपांडे यांना अमाप लोकप्रियता मिळाली होती. त्यांनतर "रेणुका शहाणे" यांनी हि भूमिका पार पडली.
या नाटकात एक नाटक कंपनी दाखवली आहे. ज्यात बेणारे बाई या शिक्षिका या नाटक कंपनीतील अभिनेत्री असतात. जे न्यायालयीन खटल्याचे नाट्यमय रूपांतर सादर करीत असतात. या नाटकात असेच सर्व कलाकार दुसऱ्या ठिकाणी नाटकाच्या सादरीकरणासाठी जातात पण त्याचवेळी त्यांच्यातील एक कलाकार नाहीसा होतो.
त्याच्या जागी ते एका नवीन पात्राला घेतात. पण त्याला नाटक म्हणजे काय हेही माहित नसते. नाटक सुरु होण्यासाठी देखील अजून वेळ असतो म्हणून त्या नाटक कंपनीतील बेणारे बाई नावाच्या पत्रावर खोटा खटला लढवून त्याला नाटक शिकविण्याचे ठरवतात. बेणारे बाईच्या आयुष्यात आलेले पुरुष येऊन बेणारे बाई कशी बेताल बाई आहे हा आरोप तिच्यावर लावण्यात येतो. हा खोटा आरोप आणि खोटा वाटणारा खटला कसा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खऱ्या घटनांना जोडला जातो. त्यानंतर बेणारे बाईच्या आयुष्याचे सत्य स्वरूप बाहेर पडते. समाजाकडून तिच्यावर आरोपांचा भडीमार सुरु होतो. यात फक्त आणि फक्त स्त्रीलाच दोषी कसे ठरविले जाते. यातून सुटण्याचा ती खूप प्रयत्न करते. पण तिला ते शक्य होत नाही. यातील बेणारे बाईने " जीवन हि एक महा भयंकर गोष्ट आहे. " या मनोगताच्या वेळी जीवन आणि समाजाचा क्रूर चेहरा समोर मांडण्याचा प्रयत्न करते. 'कुमारीमातेला' दिली जाणारी दूषणे, कलंक, आरोपांचा भडीमार, समाजापासून एकटे करणे. अश्या अनेक मुद्द्यांवर बेणारे बाई हे पात्र भाष्य करते.
आज हि आपल्या आधुनिक समाज सहज कुमारीमाता ताठ मानेने चारचौघात राहताना दिसणार नाही. एक तर तिला आश्रमात ठेवले जाते किंवा राहते घर - कुटुंबापासून दूर कोणत्या तरी गावी ठेवले जाते. जिथे तिला कोणी ओळखत नाही. जर अशी कुमार माता समोर आली तर, आज हि तितकीच मौन पाळले जाते. आणि त्या मौनातून तिला दोषी ठरविले जाते. तिच्या जीवावर बेतून गर्भपात केले जातात किंवा भ्रूणहत्या केली जाते किंवा त्या बाळाला मंदिरात सोडून दिले जाते. विजय तेंडुलकर यांच्या लिखाणातील काळातही संकुचित मानसिकतेचा समाज दाखविला आहे. आज काळ बदलला तरीही समाजाची मानसिकता मात्र अजूनही तशीच संकुचित राहिली आहे.
सदर नाटकाची लिंक :
Anjali Pravin
amkar.anju@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा