|  | 
| PC:google | 
इंडिया काय नि भारत काय
मले काय मिळून राहिले त्याचे 
इंडियाचा भारत करा नाही तर भारताचा इंडिया करा 
मले काय मिळून राहिले त्याचे 
मले सांग, 
याने देशातला जाती-धर्म भेद थांबेल काय ?
दरवेळी दंगलीत मरणारा सामान्य माणूस "भारत माता कि जय " बोलला तर मरायचा वाचेल काय ?
नाही ना .. मग  इंडिया काय नि भारत काय 
मले काय मिळून राहिले त्याचे 
मले सांग, 
शेतकरी आत्महत्या थांबेल काय ?
जमिनी, नदी आणि जंगलांचा विनाश होणे थांबेल काय ?
नाही ना .. मग  इंडिया काय नि भारत काय 
मले काय मिळून राहिले त्याचे 
मले सांग, 
स्त्रीभ्रूण हत्या थांबेल काय ?
भारतात निर्भया निर्भयपणे राहू शकेल काय ? रात्रीची एकटी फिरू शकेल काय ?
नाही ना .. मग  इंडिया काय नि भारत काय 
मले काय मिळून राहिले त्याचे 
मले सांग, 
मणिपूर जळायचे थांबेल काय ?
काश्मीर मध्ये सुरक्षित वातावरण मिळाले काय ?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत होणारी जाती पातीची भांडण थांबतील काय ?
नाही ना .. मग  इंडिया काय नि भारत काय 
मले काय मिळून राहिले त्याचे 
 
मले सांग, 
"भारत" म्हटले कि, मले  नोकरी मिळेल काय ?
चांगले सरकारी शिक्षण मिळेल काय ?
सरकारी हॉस्पिटल मध्ये चांगल्या सुविधा मिळतील काय ?
बिना खड्याचे चांगले रेशन मिळेल काय ?
नाही ना .. मग  इंडिया काय नि भारत काय 
मले काय मिळून राहिले त्याचे 
म्हणजे तुझा विरोध आहे ना "भारत" नावाला .. 
बापाओ पुन्हा तेच 
विरोध करून मले काय मिळणार 
समर्थन करून मले काय मिळणार 
राजा बदलतो तसे राज्यांचे नाव बदलते 
आतापर्यन्त १००हुन अधिक जिल्हे किंवा राज्याची नावे बदलली आहेत 
पण 
मले काय मिळून राहिले त्याचे
राजा नाव बदलत राहतो पण प्रजेचे समस्या आणि  प्रश्न मात्र बदलत नाही
अंजली प्रविण
amkar.anju@gmail.com
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा